jump to navigation

बाबा आमटे March 6, 2006

Posted by neelkant in माहिती, विदर्भ, व्यक्ती परिचय.
add a comment

Baba Amte  

बाबा आमटे

मुरलीधर देवीदास आमटे

जन्म – १९१४

१९५८ – रॅमन मॅगसेसे पुरस्कार

१९८६ – पद्मविभूण, पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार

१९८८ – मानवी हक्क पुरस्कार .

१९९० – टेंपल्ट पुरस्कार .

१९९१ – राईट लाइव्हली हुड पुरस्कार .

पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५०० पुरस्कार .

१९९९ – म. गांधी पुरस्कार .

 कुष्ठरोग्यांसाठी संस्था स्थापन केल्या –

सोमनाथ – मूल(चंद्रपूर)

आनंदवन – वरोरा (चंद्रपूर)

अशोकवन – नागपूर

नागेपल्ली , हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प. 

‘ज्वाला आणि फुले’ हा काव्यसंग्रह

‘उज्ज्वल उद्यासाठी’ (काव्य)

‘माती जागवील त्याला मत’

थोर समाजसुधारक

कुष्ठरोग निर्मूलन , पुनर्वसन

आनंदवन मूळच्या खडकाळ जमीनीत शेतीविषयक विविध प्रयोग.

राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते

१९८५ – शंभर दिवसांचे भारत जोडो आंदोलन .

नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व

सामाजिक नैसर्गिक पर्यावरण क्षेत्रात सक्रिय कार्य.

डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख) March 6, 2006

Posted by neelkant in माहिती, विदर्भ, व्यक्ती परिचय.
add a comment

Dr. Panjabrao Deshmukh

मूळ आडनाव – कदम

जन्म – २७ डिसेंबर १८९८, पापळ (अमरावती ) येथे

मृत्यू – १० एप्रिल १९६५ दिल्ली येथे.

१९२७- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी ‘महाराष्ट्र केसरी’ हे वर्तमानपत्र चालविले.

वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास’ या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.

१९३३ – शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारीत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.

१९२६ – मुष्ठीफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.

१९२७ – शेतकरी संघाची स्थापना.

१९३२ – श्री. ए. डब्ल्यु. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना .

ग्रामोध्दार मंडळाची स्थापना.

१९५० – लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रुपांतर करण्यात आले.

१९५५ – भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने ‘राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.

१९५६ – अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.

‘भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा’.

१८ ऑगस्ट १९२८ – अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .

१९३० – प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री

लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.

१९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषीमंत्री. भारताचे पहिले कृषीमंत्री.

देवस्थानची संपत्ती सरकाराने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देश्याने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.

१९६० – दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.